नाशिक2 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
तळागाळातील महिला सक्षमीकरणापासून अद्यापही वंचित आहेत. अशा महिलांसाठी सर्व स्तरावर अधिक काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन साेलापूर येथील निरामय संस्थेच्या प्रमुख सीमा किणीकर यांनी केले. ‘मिळून साऱ्या जणी’ या महिला संघटनेतर्फे आयाेजित स्मरणिका प्रकाशनप्रसंगी त्या बाेलत हाेत्या. प्रारंभी कलानंद नृत्य संस्थेच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. त्यानंतर संघटनेच्या अध्यक्षा सीमा शिंपी यांनी संस्थेची माहिती दिली.पाहुण्यांचा परिचय प्राची कुलकर्णी यांनी करून दिला.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या शीतल जगताप, संगीता जाधव व ठिगळे यांना सत्कर करण्यात आला. सीमा किणीकर यांच्या हस्ते स्मरणिका प्रकाशन केल्यानंतर त्यांची मुलाखत वृंदा लवटे यांनी घेतली. एड्सग्रस्त महिला. वेश्याव्यवसायातील महिलांसंबंधी काम करताना आलेले विदारक अनुभव किणीकर यांनी मांडले. कार्यक्रमास निशिगंधा माेगल, प्रभाताई कुलकर्णी, हिर कुलकर्णी, माेना वैद्य, पद्मा साेनी, संगीता अमृतकर, दीपाली कांगणे, रेवती पारख आदी उपस्थित हाेते. सूत्रसंचालन सरिता शिरुडे केले. आभारप्रदर्शन संजीवनी कुलकर्णी यांनी केले.