जळगाव18 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
अखिल भारतीय तेरापंथ महिला मंडळाच्या निर्देशानुसार जळगाव येथील शाखेतर्फे कर्तबगार महिलांचा सन्मान आणित ‘तालमेल’ हा विशेष कार्यक्रम घेण्यात आला. प्रगतीच्या वाटा स्वत: जिद्दीने शाेधणाऱ्या महिलांचे कार्य इतरांनाही प्रेरणा देते. किंबहुना, रस्ता दाखवण्यासाठी ते महत्त्वाचे ठरते, असा सूर या कार्यक्रमात मान्यवर वक्त्यांनी साधलेल्या संवादातून व्यक्त झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विनीता समदडीया व सदस्यांनी प्रेरणागीत सादर केले. अध्यक्षा नम्रता सेठिया यांनी विचार व्यक्त केले.
‘तालमेल’ कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात आत्मनिर्भर असलेल्या २५ महिलांचा ‘तालमेल’ नाव लिहिलेला दुपट्टा देऊन सन्मानित करण्यात आले. डाॅ. प्रिती भुरट, सीए सुमन सेठिया, इंटेरीयर डिझायनर स्वीटी बोथरा, साडी विक्रेत्या मीनाक्षी बैद, सीए श्वेता चौरडीया, वर्षा चौरडीया यांनी मनाेगत व्यक्त केले. प्रमुख वक्ता स्नेहा गादियाका यांचा बांबू ट्री देऊन गाैरव करण्यात आला. अर्थात, या सन्मानातून पर्यावरण संवर्धनाला लाेकचवळीचे स्वरुप येणे अपेक्षित आहे असा संदेश देण्यात आला. सहाय्यक पाेलिस निरीक्षक सुनंदा पुंडीक पाटील यांचा विशेष गाैरव करण्यात आला. त्यांच्या कार्याचा परिचय अमिता सेठिया यांनी दिला. सन्मानपत्राचे वाचन सचिव सरिता धाडेवा यांनी केले. कार्यक्रमासाठी ज्योती बोथरा यांचे सहकार्य लाभले. आभार उपाध्यक्षा रीटा बैद यांनी मानले. सूत्रसंचालन उपाध्यक्षा स्नेहलता सेठिया, कार्यकारिणी सदस्या अमिता सेठिया यांनी केले.
वेळेचे महत्व आेळखून कुटुंबाची काळजी घ्या : गादिया
महिलांनी आत्मनिर्भर हाेणे वर्तमानाची गरज आहे. वेळेचे महत्व आेळखून कुटुंबाची काळजी घेताना स्वत:च्या आराेग्याकडे दुर्लक्ष हाेऊ देऊ नका. सकारात्मक विचाराने पाऊल टाका म्हणजे यशाेशिखर नक्कीच गाठता येईल. निर्णयक्षमता विकसित करण्यासाठी स्वत:च पुढाकार घ्या. एखादा निर्णय घेताना चुकण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण त्या चुका सुधारून माेठे यश भविष्यात मिळू शकते. विज्ञान, तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन प्रत्येक महिलेने उद्यमी बनावे, असा सल्ला स्नेहा गादिया यांनी दिला.