शिखर धवन घरी पोहचताच त्याची धुलाई, नेमकी कशामुळे झाली धुलाई वाचा…

शिखर धवन घरी पोहचताच त्याची धुलाई, नेमकी कशामुळे झाली धुलाई वाचा...
शिखर धवन घरी पोहचताच त्याची धुलाई, नेमकी कशामुळे झाली धुलाई वाचा...

भारताचा दिग्गज सलामीवीर फलंदाज शिखर धवन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. प्ले ऑफपूर्वीच आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर धवनने त्याच्या घराचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली जात आहे. व्हिडिओ शेअर होताच प्रतिक्रियांची जणू रंगच लागली. काय आहे या व्हिडिओची संपूर्ण कहाणी जाणून घ्या.

पंजाब किंग्ज आयपीएल २०२२ च्या प्ले ऑफसाठी पात्र ठरू शकला नाही. शिखर धवन या संघाचा भाग होता. पंजाब किंग्सचे आव्हान संपुष्टात आल्यावर जेव्हा धवन घरी पोहोचला तेव्हा गब्बरला त्याच्या वडिलांच्या नाराजीचा सामना करावा लागला. या व्हिडिओमध्ये त्याला लाथ आणि मुक्क्यांनी मारहाण करणारा व्यक्ती दुसरा कोणी नसून त्याचे वडील आहेत. प्ले ऑफच्या आधी बाहेर पडण्यासाठी त्याला लाथा मारत विनोदी पद्धतीने अभिनय करत आहे.

Advertisement

शिखर धवनचा अभिनय पाहून हरभजन सिंहने इंस्टाग्रामवर कमेंट लिहिली की “बापू तर तुझ्याहुनही मोठे अभिनेते आहेत, वाह काय बात आहे.” एशिअवय समालोचक गौरव कपूरने “हा हा हा फुल परफॉर्मर फॅमिली” लिहिले. शिखर धवनने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, माझ्या वडिलांसाठी नॉकआऊटमध्ये पात्र न ठरल्याचा याचा अर्थ असा आहे आणि हसणारा इमोजी वापरला. पंजाब किंग्स आयपीएल २०२२ पॉइंट टेबलमध्ये ७ विजय आणि तितक्याच पराभवांसह सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखालील संघाला आयपीएल २०२३ मध्ये त्यांचे पहिले आयपीएल विजेतेपद जिंकण्यासाठी जोरदार पुनरागमन करावे लागेल.

या मोसमात पंजाबचा संघ सहाव्या क्रमांकावर राहिला. तर शिखर धवन आयपीएलच्या या मोसमात पंजाबकडून खेळला. पंजाबचा संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरू शकला नाही, पण शिखर धवनने पंजाबसाठी फलंदाजीने चांगले प्रभावित केले. त्याने १४ सामन्यात ३८ च्या सरासरीने ४६० धावा केल्या. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा चौथा आघाडीचा फलंदाज आहे. आयपीएल २०२२ मध्ये चांगली कामगिरी करूनही धवनला बीसीसीआयच्या निवडकर्त्यांनी दुर्लक्षित केले. आयपीएल २०२२ मध्ये त्याने ३८.३३ च्या सरासरीने धावा केल्या. मात्र, सूत्रांचे म्हणणे आहे की धवनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेसाठी संघात घेतले जाणार नसल्याच्या व्यवस्थापनाचा निर्णया कळवण्यात आला होता.

Advertisement