शहरात दिवसाला सरासरी‎ 45 नागरिकांना श्वानदंश‎: नागरिकांचे रात्री घराबाहेर पडणे झाले कठीण‎, संथ निर्बीजीकरण प्रक्रिया


स्वप्नील सवाळे | अमरावती‎33 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

चार वर्षे ठप्प राहिलेली निर्बीजीकरण‎ प्रक्रिया, प्राणिमित्रांचा विरोध यामुळे‎ शहरासह जिल्ह्यात मोकाट श्वानांची‎ संख्या अनियंत्रितपणे वाढली असून‎ नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.‎ रात्री फिरताना कुत्री अंगावर धावून येत‎ असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक घाबरले‎ आहेत. जिल्ह्यात वर्षभरात २८ हजार ३९१‎ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला.

Advertisement

मनपा‎ क्षेत्रात वर्षभरात १६ हजार ५२९ कुत्र्यांनी‎ चावा घेतला. त्यानुसार दररोज सरासरी‎ ४५ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या ‎ ‎ घटना घडल्या आहेत. तरीही या मोकाट ‎ ‎ कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस ‎ ‎ उपाययोजना शासन स्तरावरून होत‎ नसल्याबद्दल संताप आणि चीड व्यक्त‎ केली जात आहे.‎ नगर पालिका, मनपा प्रशासनाकडून या‎ कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी‎ मागील काही वर्षांत खर्च झालेल्या‎ निधीच्या प्रमाणात कुत्र्यांची संख्या कमी‎ होण्याऐवजी त्यात वाढ झाल्याचे दिसून‎ येत आहे. त्यामुळे निर्बीजीकरणाच्या‎ मोहिमेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.‎ मनपा क्षेत्रात १६ हजार ५२९ जणांना कुत्री‎ चावल्याचे धक्कादायक वास्तव आहे.‎ त्यामुळे रात्रीचे घराबाहेर पडताना‎ आम्हाला भीती वाटते, अशा प्रतिक्रिया‎ नागरिकांनी दिल्या.

खेळणाऱ्या मुलांना‎ घेतला चावा

Advertisement

परिसरामध्ये अलीकडे‎ भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले‎ आहे. हे कुत्रे घरात घुसायलाही‎ कमी करत नाही. सायंकाळच्या‎ वेळी लहान मुले अंगणात‎ खेळत असताना हे कुत्रे‎ त्यांच्यावर हल्ला चढवून चावा‎ घेत आहेत. सुदैवाने काही मुले‎ त्यांच्या तावडीतून सुटलीत.‎ परंतु, ज्या मुलांना चावा घेतला‎ त्यांच्या मनामध्ये कुत्र्यांविषयी‎ धास्ती निर्माण झाली असून‎ परिसरातील नागरिकांनीदेखील‎ कुत्र्यांचा धसका घेतला आहे.‎ -अजिंक्य नळकांडे,‎ नागरिक‎

दाेन हजार श्वानांचे निर्बीजीकरण‎

Advertisement

मे २०१६ ते जुलै २०१७ या कालावधीत ९ हजार ८८४ श्वानांची नसबंदी करण्यात आली.‎ त्यावर प्रति श्वान ७४५ रुपये खर्च केला. त्यानंतर काही कारणास्तव निर्बिजीकरण मोहीम‎ बंद होती. मात्र, मध्यंतरी मनपा प्रशासनाने पुन्हा सुरू केली आहे. अलीकडे २ हजारांच्या‎ वर कुत्र्यांवर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी पथकेही गठीत‎ करण्यात आली आहेत.‎ -डॉ. सचिन बोंद्रे, पशू शल्य चिकित्सक, मनपा,अमरावती.‎

कुत्र्यांनी चावा घेतलेल्या नागरिकांवर‎ झालेले उपचार‎

Advertisement

इर्विंन रुग्णालय १६५२९, अंजनगाव सूर्जी १४६८,‎ भातकुली ४४८, चांदूर बाजार १५०१, चांदूर रेल्वे‎ ६१३, चिखलदरा ६०, चूरणी २७८, धामणगाव रेल्वे‎ ३९७, नांदगांव खंडेश्वर ५६४, वरूड ९०१,‎ अचलपूर २१७७, दर्यापूर १०९३, धारणी ८३९ मोर्शी‎ ८७०, तिवसा ६५३ एकूण २८३९१.‎



Source link

Advertisement