मुंबई8 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
मुंबईहून व्हिएतनामच्या हो ची मिन्ह शहराला जाणाऱ्या व्हिएतजेट एअरलाइन्सच्या विमानाने तांत्रिक बिघाडामुळे सुमारे 10 तास उशिराने उड्डाण केले. यादरम्यान विमानातील 300 प्रवासी रात्रभर विमानातच राहिले. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, यादरम्यान त्यांना काहीही खायला दिले गेले नाही. तसेच त्यांना वेटिंग एरियामध्ये नेण्यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही.
वेळापत्रकानुसार VJ-884 हे विमान 25 मे रोजी रात्री 11.30 वाजता मुंबईहून निघणार होते. 26 मे रोजी 5 वाजेपर्यंत विमानाने उड्डाण घेतले नव्हते. एका प्रवाशाने सांगितले की, सकाळी 7 वाजता त्यांना वेटिंग एरियात नेण्यात आले. डीजीसीएच्या म्हणण्यानुसार, एखाद्या फ्लाइटला उशीर झाल्यास प्रवाशांसाठी जेवण आणि हॉटेल्सची व्यवस्था करण्याची जबाबदारी एअरलाइन्सची असते.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालय म्हणजेच DGCA ही सरकारची नियामक संस्था आहे, जी नागरी उड्डाणाचे नियमन करते. यामध्ये प्रामुख्याने विमान अपघात आणि इतर घटनांचा तपास केला जातो.
सुमारे 8 तासांच्या प्रतीक्षेनंतर प्रवाशांना वेटिंग एरियात आणण्यात आले.
दुसऱ्या फ्लाइटची व्यवस्था नाही
एका प्रवाशाने सांगितले – आम्ही रात्री 11 वाजता फ्लाइटमध्ये चढलो. तासाभरानंतर जेव्हा फ्लाइट टेक ऑफ झाले नाही तेव्हा आम्ही क्रूला विचारले. तांत्रिक बिघाडामुळे विमान उशिराने उडेल, असे उत्तर देण्यात आले. आमच्या जेवणाची व राहण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. आम्हाला पहाटे 5 वाजेपर्यंत फ्लाइटमध्ये बसावे लागले. आम्हाला पर्यायी उड्डाणाची माहितीही देण्यात आली नाही.