विखे पाटील यांची घोषणा: नागपूर जि. प. तील भ्रष्टाचाराची ‘इओडब्ल्यू’मार्फत होणार चौकशी


छत्रपती संभाजीनगरएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

नागपूर जिल्हा परिषदेतील प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण निधी योजनेअंतर्गत गाय व शेळी गट वाटपात झालेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत मांडला. यावर उत्तर देताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्याची घोषणा केली.प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण निधी योजनेअंतर्गत नागपूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व १३ तालुक्यात दुग्ध विकास व शेळीपालन लाभार्थ्यांकरिता गट वाटप योजना राबवली होती. खनिज क्षेत्र असलेल्या भागात ही योजना राबवण्यात येते, यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला. मात्र यात लाभार्थी निवड करताना गाय व शेळी मेंढी वाटप करण्यात मोठा भ्रष्टाचार झाला.

Advertisement

याबाबतच्या तक्रारी केल्या होत्या. या प्रकरणाच्या चौकशीत काय निष्पन्न झाले व कोणता निर्णय घेतला, काय कारवाई करणार, असा प्रश्न आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारला. यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य अधिकारी यांच्यामार्फत चौकशी करण्यात येईल, अशी माहिती दिली.तथापि, बावनकुळे यांचे उत्तराने समाधान झाले नाही. ज्यांनी वाटप केले त्यांनीच चौकशी केली असे सांगितले. लाभार्थी निवड करण्यासाठी जाहिरात देण्यात आली नाही. खाण बाधित गावांच्या लाभार्थ्यांची निवड झाली नाही. खरेदीकरिता निविदा काढली नाही. जेथून नको तेथूनच गायी खरेदी करण्यात आल्या. इकडच्या गायी तिकडे आणि तिकडच्या इकडे करण्यात आल्या. ज्याने भ्रष्टाचार केला, तो चौकशी करू शकत नाही, असा मुद्दा उपस्थित केला. या प्रकरणात लाभार्थ्यांना पैसा गेलाच नाही, तर वसूल कसा करणार, असा प्रश्न करून अधिकाऱ्यांनी पैसा गायब केल्याचे सांगितले. यामुळे या प्रकरणाची चौकशी पोलिस आयुक्तांच्या माध्यमातून आर्थिक गुन्हे शाखेने करावी, अशी मागणी केली.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement