लघुद्योगात राबतात बालके: परिस्थितीशी दोन हात करताना‎ लहानग्यांचे कोमेजतेय बालपण‎, कर्ता व्यक्ती गमावल्यामुळे ओढवली जबाबदारी


महेश पटारे | नगर‎14 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

बालकामगार प्रतिबंधक अधिनियम अस्तित्वात असूनही‎ अनेक आस्थापना व लघुउद्योगांमध्ये बालमजूर राबताना ‎ ‎ दिसत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात बालमजुरांची‎ अधिकृत आकडेवारी शासनदरबारी उपलब्ध नसली तरी ‎ ‎ बहुसंख्येने शाळाबाह्य मुले मोलमजुरी करताना दिसून‎ येतात. प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. अशा ‎ ‎ बालकांचे पुनर्वसन करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य‎ प्रवाहात आणण्याची गरज आहे.‎ बांधकामाच्या ठिकाणी, हॉटेल्स, व्यापारी प्रतिष्ठाने, ‎ ‎ वर्कशॉप, गॅरेज, शेतकाम, विटभट्टी, भाजीपाला विक्री, ‎ ‎ किराणा दुकाने, जनरल स्टोअर्स, कपड्यांची दुकाने,‎ तसेच लघुउद्योगातही कमी मजुरी देऊन बालकामगारांना ‎ ‎ कामावर घेतले जाते. तेथे कामाला असल्याची अधिकृत ‎ ‎ नोंदही नसते. त्यामुळे बालकांकडून मजुरी होत असल्याचे ‎ ‎ अधिकृतपणे दिसून येत नाही. कोरोना संसर्गजन्य‎ महामारीच्या दोन्ही लाटांमध्ये बहुतांश घरातील कर्त्या‎ व्यक्ती गमावले. अशा कुटुंबातील बालकांच्या नशीबी‎ परिस्थितीशी दोन हात करण्याची वेळ आलेली आहे.‎ त्यामुळे अनेक बालके शाळेसोबत कुठे ना कुठे काम‎ करताना दिसत आहेत. अशा बालकांना स्वयंसेवी‎ संस्थेमध्ये राहून शिक्षण घेता येईल, त्यासाठी‎ चाईल्डलाईन स्वयंसेवी संस्था, महिला बालकल्याण‎ विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन केलेले आहे.‎

Advertisement

कायदा काय सांगतो ?‎

बालकामगार प्रतिबंधक‎ अधिनियमानुसार १४ वर्षाखालील‎ मुलांना कामावर ठेवण्यास प्रतिबंध‎ आहे. शारीरिक व मानसिक‎ आरोग्यास हानिकारक १६ व्यवसाय‎ व धोकादायक ६५ प्रक्रियांमध्ये‎ मुलांना कामावर ठेवण्यास मनाई‎ आहे. ज्या आस्थापनांमध्ये मुलांना‎ कामावर ठेवण्यास परवानगी आहे,‎ तेथे हा अधिनियम नियंत्रण ठेवतो.‎

Advertisement

अशी आहे शिक्षेची तरतूद‎

ज्या आस्थापनांमध्ये मुलांना‎ कामावर ठेवण्यास परवानगी‎ दिलेली आहे, तेथे बालकामगार‎ प्रतिबंधक अधिनियम नियंत्रण‎ ठेवतो. या अधिनियमाचे उल्लंघन‎ व नियमभंग करणाऱ्यांना ३‎ महिन्यांपासून ते १ वर्षापर्यंत‎ तुरुंगवास होऊ शकतो. तसेच १० ते‎ २० हजार रुपयांचा आर्थिक दंडही‎ ठोठावला जाऊ शकतो.‎

Advertisement

बालमजुरांची सुटका‎

चाइल्डलाइन व पोलिसांनी डिसेंबर‎ महिन्यात ऑपरेशन मुस्कान या‎ मोहिमेअंतर्गत शिर्डी शहरात पाच‎ दिवस मोहिम राबवून २० हून‎ अधिक बालकांची बालमजुरीतून‎ सुटका करण्यात आली होती.‎

Advertisement

पुनर्वसन करून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज‎

मोहीम महिनाभरच‎ दरवर्षी राज्य शासनाच्या सूचनेनुसार‎ जिल्ह्यात जानेवारी महिन्यात‎ ऑपरेशन मुस्कान राबवले जाते.‎ यामध्ये पोलिसांचा मानवी‎ तस्करीविरोधी विभाग, सहायक‎ कामगार कार्यालय, महसूल विभाग‎ व स्वयंसेवी संस्था पाहणी करून‎ बालमजुरांची सुटका करतात. पण,‎ ही मोहिम काही दिवसच राबवली‎ जाते. नंतर वर्षभर बंद होते.‎

Advertisement

चाइल्डलाइन स्वयंसेवी संस्था अहोरात्र दक्ष‎

स्नेहालय संस्थेअंतर्गत चाइल्डलाइन ही एकमेव स्वयंसेवी संस्था वर्षभर‎ अहोरात्र बालकांच्या हक्कांसाठी व सुरक्षिततेसाठी दक्ष असते. १०९८ या‎ टोलफ्री क्रमांकावर माहिती मिळताच या संस्थेचे सदस्य तत्परतेने मदतीला‎ हजर होतात. बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार स्वयंसेवी संस्थेकडे‎ निराधार बालकांचे पालकत्व सोपवले जाते.‎ महेश सूर्यवंशी, केंद्र समन्वयक, चाइल्डलाइन.‎

Advertisement



Source link

Advertisement