रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलुरूच्या माजी कर्णधाराने रोहित शर्माने सलामीला येणे बंद करावे

रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलुरूच्या माजी कर्णधाराने रोहित शर्माने सलामीला येणे बंद करावे
रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलुरूच्या माजी कर्णधाराने रोहित शर्माने सलामीला येणे बंद करावे

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मुंबई इंडियन्सने खराब कामगिरी केली आहे. मुंबई इंडियन्सला आतापर्यंत एकही सामना जिंकता आलेला नाही. सलग सात सामने गमावल्यानंतर आता मुंबई इंडिन्स प्ले ऑफपर्यंत पोहोचण्याचा शर्यतीतून अगोदरच बाहेर पडला आहे. दरम्यान, न्यूझीलंड तसेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा माजी कर्णधार डॅनियल व्हेटोरीने रोहित शर्माच्या खेळाबाबत मोठे भाष्य केले आहे. रोहित शर्माने फलंदाजीसाठी सलामीला खेळू नये असे व्हेटोरीने म्हटले आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात रोहित शर्मा चांगली कामगिरी करु शकलेला नाही. त्याने या हंगामातील पहिल्या सामन्यात दिल्लीविरोधात खेळताना ४२ धावा केल्या होत्या.

डॅनियल व्हेटोरीने ईएसपीएन क्रिक इन्फोशी बोलताना रोहित शर्माच्या फलंदाजीवर भाष्य केले आहे. “रोहित शर्मा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. त्यामुळे त्याला हा निर्णय घेणे तसे अवघड आहे. मात्र रोहितची आतापर्यंतची कामगिरी पाहता त्याने सलामीला फलंदाजी करण्यापेक्षा दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकवर फलंदाजीसाठी येणे योग्य होईल. यामुळे त्याच्या खेळात सुधारणा होऊ शकते. तसेच त्याच्यावरील दडपणदेखील कमी होऊ शकते,” असे व्हेटोरीने म्हटले आहे.

Advertisement

डॅनियल व्हेटोरीने ईएसपीएन क्रिक इन्फोशी बोलताना रोहित शर्माच्या फलंदाजीवर भाष्य केले आहे. “रोहित शर्मा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. त्यामुळे त्याला हा निर्णय घेणे तसे अवघड आहे. मात्र रोहितची आतापर्यंतची कामगिरी पाहता त्याने सलामीला फलंदाजी करण्यापेक्षा दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकवर फलंदाजीसाठी येणे योग्य होईल. यामुळे त्याच्या खेळात सुधारणा होऊ शकते. तसेच त्याच्यावरील दडपणदेखील कमी होऊ शकते,” असे व्हेटोरीने म्हटले आहे.

मुंबई इंडियन्स आता आठव्या सामन्यात तरी विजय मिळवतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. पण त्यासाठी आता रोहितला एक खास गोष्ट करावी लागणार आहे. गेल्या सामन्यात तर रोहित शर्मा हा पहिल्याच षटकात बाद झाला होता. त्याला भोपळाही फोडता आला नव्हता. त्यापूर्वी झालेल्या लखनौ सुपर जायंट्सच्या सामन्यात रोहितला सहा धावा करता आल्या होत्या. गेल्या पाच सामन्यांचा विचार केला तर रोहितला फक्त ६३ धावाच करता आल्या आहेत, यामध्ये २८ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. आतापर्यंतच्या सातही सामन्यांमध्ये रोहितला मोठी खेळी साकारता आलेली नाही आणि मुंबई इंडियन्सच्या पराभवाचे हे एक मोठे कारण ठरत आहे.

Advertisement