राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाची हजेरी: छत्रपती संभाजीनगरसह 13 जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट, गारपिटीची शक्यता


34 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. छत्रपती संभाजीनगरसह सातारा, पुणे, धुळे, वर्धा, नंदूरबारमध्ये ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळत आहे.

Advertisement

हवामान विभागाने राज्यात 18 मार्चपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विशेषत: फळबागांचे मोठे नुकसान होण्याची भीती वर्तवली जात आहे.

देशभरात अवकाळीचे ढग

Advertisement

केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील बहुतांश भाग हा अवकाळी पावसाच्या ढगांनी व्यापल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. हवामान विभागाने उपग्रह छायात्रित्रही जारी केले आहे. त्यात महाराष्ट्र, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, ओडिशा, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यांवर अवकाळी पावसाचे ढग जमा झाल्याचे दिसत आहे. या भागात पुढील काही तासांत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने जारी केलेले उपग्रह छायाचित्र.

Advertisement

आज या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील जवळपास 13 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट म्हणजेच मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर, पुणे, अहमदनगर, नाशिक, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, नागपूर, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांत आज दिवसभरात मुसळधार पावसाची शक्यता असून गरज असेल तेव्हाच नागरिकांनी घराबाहेर पडावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Advertisement

शुक्रवारी 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

उद्या शुक्रवारी 17 मार्चरोजी राज्यातील 9 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अहमदनगर, परभणी, हिंगोली, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. शनिवारी 18 मार्चपर्यंत राज्यातील ढगाळ वातावरण निवळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Advertisement

पिकांना फटका; सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले

सध्या गहू, हरभरा, कांदा काढणीचे दिवस आहेत. मात्र, या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पिकांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. तसेच, यामुळे साथीचे आजारही वाढण्याचा धोका आहे. वातावरणात अचानक झालेल्या या बदलामुळे सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण वाढत आहे.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement