राजारामच्या बोगस सभासदांचा ‘कंडका’ पडला !: राजाराम कारखान्याचे 1272 सभासद अपात्र, सतेज पाटलांच्या बाजूने निकाल

राजारामच्या बोगस सभासदांचा ‘कंडका’ पडला !: राजाराम कारखान्याचे 1272 सभासद अपात्र, सतेज पाटलांच्या बाजूने निकाल


कोल्हापूर13 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे 1272 सभासद अपात्र असल्याचा निर्णय प्रादेशिक सहसंचालक यांनी दिला आहे. याप्रकरणी आमदार सतेज पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. कागदपत्रांची तपासणी करून सभासद अपात्र असल्याचा निर्णय दिल्याने सत्ताधारी महाडिक गटाला मोठा धक्का बसला आहे.

Advertisement

याबाबत अधिक माहिती देताना आमदार सतेज पाटील यांनी सांगितले की, महाडिक गटाने बनावट कागदपत्राच्या आधारे सभासद वाढवले होते. हे सभासद अपात्र करावेत म्हणून दोन वर्षांपूर्वी प्रादेशिक सहसंचालकाकडे दाद मागितली होती. त्यानुसार त्यांनी 1346 सभासद अपात्र केले. हाच निर्णय सहकार मंत्र्यांनी व नंतर उच्च न्यायालयानेदेखील तो निर्णय कायम ठेवला. मात्र याबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने हे प्रकरण पुन्हा तपासणीसाठी प्रादेशिक सहसंचालकाकडे पाठवले. सहसंचालकांनी दोन महिने प्रत्येक सभासदांची माहिती घेऊन त्यातील बाराशे 72 सभासदांना अपात्र ठरवले आहे.

आमचा विजय निश्चित होता

Advertisement

आमदार सतेज पाटील म्हणाले की, निवडणुकीत आम्हाला सत्ताधारी महाडिक गटाच्या बरोबरीने मते मिळाली. जिंकण्यासाठी किरकोळ मते कमी पडली. हा निर्णय पूर्वी झाला असता तर आमचा विजय निश्चित होता. बेकायदेशीरपणे सभासद वाढवून महाडिक गटाने निवडणूक जिंकली आहे. पण आता सत्याचा विजय झाला आहे. हा कारखाना खऱ्या सभासदांचा मालकीचा व्हावा यासाठी आमचा लढा सुरू आहे, तो यापुढेही सुरू राहील.अपात्र सभासदांच्या मतावरच महाडिक गटाने कारखान्याची निवडणूक जिंकली. त्यामुळे फेर मतदान व्हावे म्हणून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे.

सतेज पाटील म्हणाले की, तरीसुध्दा सर्वसामान्य सभासदांच्या पाठबळावर आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो. या निवडणुकीमध्ये एकूण 12336 इतके मतदान झाले. त्यामध्ये या अपात्र सभासदांच्या मतदानाचा समावेश होता. म्हणजे नियमित 11000 सभासदांचे मतदान झाले होते. यापैकी 5000 ते 5500 मते आमच्या आघाडीला मिळाली. त्यामुळे खऱ्या सभासदांचा कौल आमच्या आघाडीला मिळाला होता हे सिध्द झाले आहे. या अपात्र सभासदांचेमुळे आमच्या उमेदवारांना 1200 ते 1250 मतांच्या फरकाने पराभव पत्करावा लागला. जर हे अपात्र सभासद मतदानास पात्र झाले नसते तर आज कारखान्यावर आमचीच सत्ता असती हे सुर्यप्रकाशा इतके स्पष्ट आहे.

Advertisement



Source link

Advertisement