मुंबईत 2 हजार मुलींवर लाठीचार्ज: अग्निशमन दलाच्या भरतीत प्रचंड गोंधळ; संतापलेल्या तरुणींचे आंदोलन



मुंबई38 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

मुंबईमध्ये दहिसर परिसरात अग्निशमन दलाच्या भरतीवेळी मोठा गोंधळ पाहायला मिळाला आहे. गोपीनाथ मुंडे शक्ती मैदानावर ही भरती प्रक्रिया सुरू असून राज्यभरातून महिला उमेदवार भरतीसाठी आल्या.

Advertisement

मात्र, भरतीमध्ये अपात्र ठरवलेल्या महिला उमेदवार संतापल्याने वातावरण शांत करण्यासाठी त्यांच्यावर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

नेमके प्रकरण काय?

Advertisement

मुंबईतील गोपीनाथ मुंडे शक्ती मैदानावर अग्निशमन दलाच्या भरतीसाठी महाराष्ट्रभरातून महिला उमेदवार आल्या. यावेळी भरतीसाठी 162 सेट सेंटिमीटर उंचीची अट ठेवण्यात आली. मात्र, त्यापेक्षा जास्त उंचइी असल्याचे सांगत अपात्र ठरलेल्या महिला उमेदवारांना आपला राग अनावर झाला, आणि त्यांनी मैदानाच्या परिसरातच घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली.

डावलल्याचा आरोप

Advertisement

अग्निशमन दलाने घालून दिलेल्या उंचीच्या नियमापेक्षा अधिक उंची असूनही या तरुणींना डावलण्यात आल्याचे या तरुणींचे म्हणणे आहे. शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून महिला उमेदवारांना पाठिंबा देण्यात आला असून ही भरती प्रक्रिया रद्द केली नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात आला आहे.

प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

Advertisement

भरती प्रक्रियेसाठी राज्यभरातून आलेल्या तरुणींनी या भरती प्रक्रियेवर आरोप केले आहेत. यात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोपही तरुणींनी केला आहे. गेली 2 दिवस आम्ही इथे आलो आहोत, आम्ही शेतकऱ्यांच्या मुली आहोत, आम्हाला उंची असून डावलण्यात येत असल्याचा आरोप मुलींनी केला आहे. तर हा आमच्यावर अन्याय असून ही भरती प्रक्रियाच रद्द करावे अशी पोलिसांकडून ही भरती प्रक्रिया राबवा, अशी मागणी या तरुणींनी केली आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement