मविआत संभ्रम: राष्ट्रवादी विरुद्ध ठाकरे गट सामना रंगण्याची चिन्हे; शरद पवारांच्या निवडणूक आदेशावरून गोंधळ


मुंबई21 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध थेट ठाकरे गट असा थेट सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याला कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या आदेशाचे ठरले आहे.

Advertisement

लोकसभा आणि विधानसभेतील दुसऱ्या क्रमांकाच्या जागेवर येणाऱ्या निवडणुकीत लक्ष द्या, असे स्पष्ट आदेश शरद पवारांनी दिलेत. मात्र, या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची लढत थेट ठाकरे गटाच्या शिवसेनेशी झालेली. त्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्रात आघाडीतले हे पक्ष समोरासमोर उभे राहणार का, हे पाहावे लागेल.

विधानसभेचे चित्र

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची 17 मे रोजी शरद पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा झाल्याचे समजते. त्यात गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार क्रमांक दोनवर होते, त्या जागांवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना शरद पवारांनी दिल्यात. याचा मोठा फटका शिवसेनेच्या ठाकरे गटाला बसण्याची शक्यता आहे. कारण 2019 मध्ये राज्यातल्या 288 विधासनसभा मतदारसंघात 48 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसला दुसऱ्या नंबरची मते मिळाली. विशेष म्हणजे यातल्या 18 मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची थेट शिवसेनेसोबत लढत झाली. त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध ठाकरे गट असा सामना रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकसभेचे चित्र

Advertisement

लोकसभेच्या 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत 48 मतदारसंघांपैकी 15 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला दोन नंबरची मते मिळाली होती. यातल्या 8 मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा थेट शिवसेनेसोबत सामना रंगला. त्यामुळे शरद पवार आपल्या भूमिकेवर ठाम राहिले, तर येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचे चित्र सुद्धा बदलू शकते. चित्र नाही बदलले तर ठाकरे गट या लढती होऊ देणार का अथवा या जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडणार का, हे येणारा काळच सांगेल.

‘मविआ’त चर्चा सुरू

Advertisement

शरद पवारांच्या उपस्थितीत नुकतीच महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत लोकसभा निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्धार झाला. यावेळी लोकसभेच्या 48 जागांच्या वाटपावर प्राथमिक चर्चा झाल्याचे समजते. त्यात 2019 मध्ये जिंकलेल्या जागा कायम राहतील. सोबतच भाजपच्या 23 मतदारसंघांत 50% जागा उद्धवसेना, तर उर्वरित 50% दोन्ही काँग्रेस लढणार असल्याचे समजते. दुसरीकडे लोकसभेसाठी तिन्ही पक्षात लोकसभेसाठी समसमान जागावाटप होईल, अशीही चर्चा आहे.

मग पुढे काय?

Advertisement

शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत विधानसभेच्या जागावाटपाचीही प्राथमिक चर्चा झाल्याचे समजते. त्यानुसार भाजपकडील 105 जागांपैकी 45% जागा उद्धवसेनेने, 30% राष्ट्रवादीने व 15 टक्के काँग्रेसने लढवाव्यात असे ठरले. वंचित, सपा, कम्युनिस्ट पक्ष, शेकाप या छोट्या पक्षांना 10 जागा मिळू शकतात. एकीकडे जागावाटपाची चर्चा सुरू असल्याचे समजते. मात्र, दुसरीकडे महाविकास आघाडीतले नेते असे काही ठरले नसल्याचे सांगत आहेत. तर एकमेकांना खिंडीत गाठण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. येणाऱ्या काळात जागावाटपावरचा सुप्त संघर्ष वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाले, तर आघाडीचे काय होणार, हा प्रश्न कायम असेल.

इतर बातम्याः

Advertisement

महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा चुकीची, अशोक चव्हाणांचे स्पष्टीकरण; दानवे म्हणाले – नो नो!

देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय अडचणीत वाढ; केंद्रीय नेतृत्वाचे विनोद तावडेंना राजकीय बळ, नड्डांच्या मुंबई दौऱ्याची चर्चा

Advertisement

महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचे नियोजनबद्ध काम, संजय राऊत यांचा शिंदे-फडणवीसांवर जोरदार निशाणा



Source link

Advertisement