भारतीय संघात उमरानचा समावेश झाल्यावर त्याचे वडील झाले भावूक, म्हणाले वेग काय असतो हे आता दुनियेला कळेल

भारतीय संघात उमरानचा समावेश झाल्यावर त्याचे वडील झाले भावूक, म्हणाले वेग काय असतो हे आता दुनियेला कळेल
भारतीय संघात उमरानचा समावेश झाल्यावर त्याचे वडील झाले भावूक, म्हणाले वेग काय असतो हे आता दुनियेला कळेल

आयपीएलमध्ये सनसनाटी गोलंदाजी करणाऱ्या उमरान मलिकने जम्मू-काश्मीरमधील नागरिकांना मोठा आनंद दिलाय. उमरानची निवड भारताच्या टी-२० संघात झाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या मालिकेसाठी झालेल्या या निवडीमुळे उमरानच्या कुटुंबातील सदस्य भावनिक झाले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये उमरानच्या घराजवळ जल्लोषाचे वातावरण आहे. सर्वजण त्याच्या घरी जाऊन शुभेच्छा देत आहेत. उमरानचे वडील माध्यमांशी बोलताना भावनिक झाले. माझ्यासाठी हा फार आनंदाचा क्षण आहे. हे सर्व त्याच्या कठोर मेहनतीमुळे झाले.

२२ वर्षीय उमरान मलिकचा आयपीएलपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. १७व्या वर्षापर्यंत त्याला कोणत्याही प्रकारचे स्पेशल कोचिंग मिळाले नव्हते, इतक नाही तर तो लेदर क्रिकेट देखील खेळला नव्हता. तोपर्यंत उमरान गल्ली क्रिकेटमध्ये टेनिस बॉल स्पर्धा खेळायचा. येथे त्याला ५०० ते ३ हजार रुपये पैसे मिळायचे. उमरान मलिकने आयपीएलच्या १५व्या हंगामात त्याच्या वेगवान गोलंदाजीने सर्वांना हैराण केले. ब्रायन लारा, सुनील गावस्कर, रवी शास्त्री या दिग्गज खेळाडूंनी त्याचे कौतुक केले होते आणि टीम इंडियात संधी मिळाली पाहिजे असे म्हटले होते. गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात उमरानने २५ धावा देत ५ विकेट घेतल्या होत्या. यापैकी ४ विकेट क्लिन बोल्डच्या होत्या.

Advertisement

आयपीएल २०२२मध्ये उमरानने हंगामातील सर्वात वेगवान चेंडू टाकला. त्याने १५७ किमी वेगाने गोलंदाजी केली. त्याच्या या कामगिरीचा विचार करूनच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दौऱ्यासाठी त्याची निवड करण्यात आली. उमरानने आयपीएलमध्ये १३ सामन्यात २०च्या सरासरीने २१ विकेट घेतल्या. २५ धावा देत ५ विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली. संपूर्ण हंगामात उमरानने वेगवान आणि उसळत्या चेंडूच्या जोरावर फलंदाजांना अडचणीत आणले होते.

या आयपीएलमध्ये उमरानने भेदक मारा तर केलाच, पण आपल्या भन्नाट वेगाने त्याने फलंदाजांसह सर्वांनाच घायाळ करून टाकले. हैदराबादच्या संघातून खेळत थेट भारतीय संघात स्थान मिळवणाऱ्या उमरान मलिकचे भुवीने यावेळी कौतुक केले. उमरान मलिक आणि अभिषक वर्मा यांनी तर दमदार कामगिरी केली आहे. पण यावेळी कोणीही राहुल त्रिपाठीला विसरूच शकत नाही.

Advertisement