पुणे2 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
पुणे शहरातील विमाननगर भागात दहशत माजविणाऱ्या प्रसाद गायकवाड गुंड टोळीविरुद्ध पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर रितेश कुमार यांनी आतापर्यंत पुणे शहरातील 52गुंड टोळ्यांविरुद्ध मोक्का कारवाई केली आहे.
याप्रकरणी प्रसाद संपत गायकवाड (वय 25, रा. महादेवनगर, वडगाव शेरी,पुणे), अरबाज अयुब पटेल (वय 24 रा. बुद्ध विहारजवळ, नागपूर चाळ, येरवडा,पुणे), बबलू संतोष गायकवाड (वय 22 ,रा. संजय पार्क, विमाननगर,पुणे) यांच्याविरुद्ध संबंधित कारवाई करण्यात आली आहे. विमाननगर भागात एका विक्रेत्याला धमकावून आरोपी गायकवाड, पटेल, गायकवाड यांनी लुटले होते. गायकवाड, पटेल सराईत आहेत. त्यांच्याविरुद्ध दरोडा, तोडफोड, दहशत माजविणे, शस्त्रे बाळगणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
यातील टोळीप्रमुख आरोपी याने त्याचे साथीदारासह स्वतःचे गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी, संघटित गुन्हेगारी संघटनेचा प्रमुख म्हणुन किंवा संघटनेच्या वतीने एकट्याने किंवा संयुक्तपणे गंभीर दुखापत, जबरीचोरी, दरोडा, सार्वजनिक मालमत्तचे नुकसान, बेकायदेशीर जमाव जमविणे, घातक शस्त्र बाळगणे अशा प्रकारचे गुन्हे करुन सर्वसामान्य जनतेमध्ये दहशत निर्माण केली आहे. यातील नमुद आरोपी यांनी विरुध्द वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करुन देखील त्यांनी पुन्हा गुन्हे केलेले आहेत.
या टोळीविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव विमानतळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे, गुन्हे शाखेच्या निरीक्षक संगीता माळी यांनी तयार केला होता. अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्याकडे प्रस्ताव पडताळणीसाठी पाठविण्यात आला होता. त्यानंतर पोलिस आयुक्तांनी गायकवाड आणि साथीदारांविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचेे आदेश दिले आहे.