नाराजीनाट्य: मतदारसंघात निधी वाटपावरून राज्य सरकारमध्ये वाद; भाजप आमदार दादाराव केचे यांचा थेट राजीनाम्याचा इशारा


वर्धा3 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव सुमित वानखेडे यांनी आर्वी मतदारसंघात विकास कामांसाठी लक्षणीय निधी आणला. त्यावर तीव्र आक्षेप घेत भाजपा आमदार केचे यांनी फडणवीस यांना पत्र लिहून एक प्रकारे जाबच विचारला आहे. शिंदे – फडणवीस सरकारमध्ये भाजप आमदार नाराज असल्याचे दिसून येत आहे. आर्वी मतदारसंघात राज्य सरकारकडून भाजप आमदारसोडून इतर कुणाच्या पत्राद्वारे विकास निधी मिळाल्याने आमदार दादाराव केचे नाराज झाले आहेत.

Advertisement

आर्वी मतदारसंघाचे आमदार दादाराव केचे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहुन नाराजी व्यक्त केली आहे.

केचे नेमके काय म्हणाले?

Advertisement

आर्वी विधानसभा मतदारसंघात राज्य सरकारकडून निधी देण्यात आला आहे. पण या निधीसाठी स्थानिक भाजप आमदार दादाराव केचे यांनी कोणतेही पत्र दिले नव्हते. दुसऱ्यांच्याच पत्रावर हा निधी देण्यात आला आहे. त्यामुळे केचे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे.

आमदार दादाराव केचे म्हणाले की, आपले पत्र नसताना दुसऱ्याच्या पत्रावर निधी देणे हा आपला घोर अपमान आहे, असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. असेच जर होत असेल तर नाईलाजास्तव मला आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल, असा इशारा दादाराव केचे यांनी दिला आहे. मी दुसऱ्यांदा आर्वीचा आमदार आहे, माझ्या पत्राशिवाय विकास निधी देऊ नये असे माझे मत आहे. तरीही माझे पत्र नसताना निधी दिला. पत्र न देता निधी दिला ही शोकांतिका आहे. हा माझा अपमान आहे, त्यामुळेच असे असेल तर मला राजीनामा देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

Advertisement

गडकरी समर्थकही इच्छूक

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे सल्लागार म्हणून ओळख असलेले सुधीर दिवे यांना देखील मतदारसंघात निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. दिवे यांनी अनेक उपक्रम, कार्यक्रमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचत दावेदारी निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे.

Advertisement



Source link

Advertisement