दखल : अलवार भावभावनांच्या कविता



‘सांजफुले’ हा तुकाराम पुंडलिक खिल्लारे यांचा मराठीतला पहिला तांकासंग्रह असल्याचं ते सांगतात. हायकूसारखाच काहीसा हा काव्यप्रकार आहे. पहिल्या तीन ओळी हायकूसारख्या ५-७-५ अशा आहेत आणि पुढे ७-७ वर्णाच्या दोन ओळी जोडायच्या. हायकूच्या मानाने तांकालेखन सोपे आहे. तांका प्रकारात केवळ काव्यगुण जपायला हवेत. बाकी तांकाला तसे कोणतेही नियम नाहीत.

Advertisement

‘कविता गाणे

अवचित पुढय़ात

Advertisement

कुणाचे येणे

शब्दांच्या साच्यातले

Advertisement

गोड कोरीव लेणे’

अशा अलवार क्षणाला कवी अलवारपणे शब्दांत गुंफतो. तर कधी-

Advertisement

‘पीक खुडून

चिपाटी उरलेली

Advertisement

शेत भयाण

ढणढणती आग

Advertisement

गेले उलून रान’

ही दाहकताही शब्दबद्ध करतो.

Advertisement

‘वाट पाहून

थकून गेले डोळे

Advertisement

अजाण भोळे

उत्कंठा क्षणोक्षणी

Advertisement

कष्टप्रद सोहळे’

ही मनोवस्था कवी अचूक पकडतो. तर-

Advertisement

‘सोस सोस हे

नको रडू बाई तू

Advertisement

बदले ऋतू

उजाडेल खचित

Advertisement

नको धरूस किंतू’

असा आशेचा किरणही या कवितांमधून दिसतो. मानवी भावभावना अचूकपणे कवीने शब्दांत उतरवल्या आहेत. तांका काव्यप्रकारात शब्दबद्ध केलेल्या या कविता एक वेगळाच आनंद देतात. 

Advertisement

सांजफुले’- तुकाराम पुंडलिक खिल्लारे, अनुदिन प्रकाशन, पाने- १३६, किंमत- १६० रुपये.



Source link

Advertisement