‘त्यांनी CMचा मान ठेवायला हवा होता’: आ. अर्जुन खोतकर जरांगे पाटलांवर नाराज; म्हणाले- समाजाच्या भल्यासाठी काही गोष्टी ऐकाव्या लागतात

‘त्यांनी CMचा मान ठेवायला हवा होता’: आ. अर्जुन खोतकर जरांगे पाटलांवर नाराज; म्हणाले- समाजाच्या भल्यासाठी काही गोष्टी ऐकाव्या लागतात


मुंबई18 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यभरात वातावरण तापले आहे. त्याच पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मंगळवारी मुख्यमंत्र्याचे एक शिष्टमंडळ दाखल झाले होते. या शिष्टमंडळाने मनोज पाटील जरांगे यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.

Advertisement

तीस दिवसांची मुदत सुद्धा यावेळी मागितली गेली. परंतू जरांगे पाटील यांनी कुठल्याहीप्रकारची मुदत न देता फक्त चार दिवसाचा अवधी सरकारला दिला आहे. या निष्फळ चर्चेवर जालनातील नेते व माजी मंत्री अर्जून खोतकर यांनी भूमिका मांडली.

शिष्टमंडळाचे व मनोज पाटील जरांगे व आंदोलन कर्त्यांची मते न जुळल्यामुळे अखेर आल्यापावली या शिष्टमंडळाला परत जावे लागले आहे. 30 दिवसानंतर एक दिवस सुद्धा शासन वेळ घेणार नाही. मात्र, एवढी विनंती करून सुद्धा आंदोलनकर्त्यांनी ऐकलेले नाही. असे म्हणत अर्जून खोतक यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच जरांगे पाटलांनी मु्ख्यमंत्र्यांचा मान ठेवायला पाहिजे होता, असेही ते म्हणाले.

Advertisement

मला असे वाटते की, मनोज पाटील जरांगेंनी ऐकायला पाहिजे होता. समाजाचं भलं करायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी ऐकाव्या लागतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत अनेकदा तह केला. ते चार पावले मागे आले आणि 25 पाऊले पुढे गेले, यश मिळवलं.

समाजाच्या हितासाठी जरांगे पाटलांनाही यश मिळता आले असते, मला अजूनही वाटतं, चर्चेची दारं बंद झालेली नाहीत. ती खुली आहेत. अजूनही चर्चा होऊ शकते. असे म्हणत माजी मंत्री अर्जून खोतकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासमवेत झालेल्या चर्चेचा वृत्तांत सांगितला. तसेच, जरांगे पाटील यांनी आंदोलन माघारी न घेतल्यामुळे अप्रत्यक्षपणे नाराजीही व्यक्त केली. दरम्यान, जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 9 वा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे, त्यांना सलाईन लावण्यात आले असून डॉक्टरांकडून सातत्याने त्यांच्या प्रकृतीची काळजी घेतली जात आहे.

Advertisement



Source link

Advertisement