जिल्ह्यातील 67 हजार 500 हेक्टर वनजमिनीवर अतिक्रमण: मेळघाटातील 41 हजार हेक्टर‎वनजमीन धनदांडग्यांच्या घशात‎

जिल्ह्यातील 67 हजार 500 हेक्टर वनजमिनीवर अतिक्रमण: मेळघाटातील 41 हजार हेक्टर‎वनजमीन धनदांडग्यांच्या घशात‎


  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • Encroachment On 67 Thousand 500 Hectares Of Forest Land In The District, 41 Thousand Hectares Of Forest Land In Melghat Is In The Hands Of Rich People.

अमरावती‎19 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात १९७८ पासून ते आजपर्यंत‎म्हणजेच ४५ वर्षात तब्बल ६७ हजार ५०० ‎‎हेक्टर वन जमिनीवर अतिक्रमण झाल्याचे ‎‎वास्तव आहे. यापैकी २६.७३५ हजार‎हेक्टर जमीन अमरावती विभागात, तर ‎‎४०.७६५ हजार हेक्टर जमीन ही‎मेळघाटात अतिक्रमित आहे.

Advertisement

एकीकडे‎शासन वन संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात ‎‎उपाययोजना करत असताना दुसरीकडे‎वन जमीनच अतिक्रमण, ताबा मिळवून,‎दावे करून हडपली जात आहे. त्यामुळे ‎‎दिवसेंदिवस वनांचा आकार लहान होत ‎‎चालला. परिणामी मनुष्य आणि ‎‎वन्यप्राण्यांमधील संघर्ष वाढायला लागला ‎‎आहे.

वन्यप्राणी शेतांचे नुकसान करत ‎‎असल्याने शेतकऱ्यांनाही दरवर्षी लाखो ‎‎रुपयांचा फटका बसतो.‎अतिक्रमण तसेच ताबा मिळवून वन ‎‎जमिनी हडपल्यामुळे शहर, गावे, शेतांचा ‎‎आकार वाढला तसा वनांचा आकार कमी ‎‎होत गेला. त्यामुळे वन्य जीव हे अन्नाच्या ‎‎शोधात शहर, गाव, शेतीकडे येत आहेत. ‎‎यामुळे पाळीव प्राणी, मनुष्यांवर वन्य‎जीवांची हल्ले, शेतातील पिकांची नासाडी ‎‎असे प्रकार वाढले आहेत.‎

Advertisement

वन जमिनींवरील‎अतिक्रमणांसंदर्भातील अनेक प्रकरणे‎सध्या न्यायप्रविष्ट आहेत. यात अमरावती‎वन विभाग व मेळघाट असे दोन भाग‎पडतात. यापैकी बहुतांश वन जमीन ही‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎शेतीसाठी त्यानंतर रहिवासी भाग,‎झोपडपट्टीसाठी, उपक्रमांसाठी तसेच‎संस्थांनी त्यांच्या फायद्यासाठी हडपल्या‎आहेत. ज्यांनी या जमिनी हडपल्या ते‎आता त्या जमिनीवरून हक्क सोडण्यास‎तयार नाहीत. परिणामी वन विभागाला‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎न्यायालयात जावे लागले आहे.‎

प्रारंभी वन जमिनीवर ताबामिळवण्यासाठी त्यांचे अतिक्रमण सुरू‎झाले तेव्हा वन विभागाने या प्रकाराकडे‎गंभीरपणे लक्षच दिले नाही. परिणामी‎हळूहळू अतिक्रमण करून जमिनीवर ताबा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎मिळवण्याची प्रकरणे वाढली. अनेकांनी‎वन हक्क दाव्यानुसार (फाॅरेस्ट राईट्स‎अॅक्ट) वन जमिनींवर ताबा मिळवला.‎यात बहुतांश जमीन ही शेतीसाठी ताब्यात‎घेण्यात आली. ‎

Advertisement

१०० हेक्टरवरील‎अतिक्रमण काढले‎

एकूणच किचकट प्रक्रियेमुळे गेल्या‎वर्षभरात वन विभागाला १०० हेक्टर‎जमिनीवरीलच अतिक्रमण काढता आले‎आहे. दोन संस्थांकडून गेल्या वर्षी ९१८‎हेक्टर जमीन परत मिळवण्यासाठी‎न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु,‎न्यायालयाचा निकाल येत नाही, तोवर वन‎विभागाला काहीही करता येणार नाही.‎

Advertisement

अतिक्रमित जमीन परत‎मिळवण्याची प्रक्रिया किचकट‎

अतिक्रमित तसेच संस्था, नागरिकांनी ताब्यात‎घेतलेल्या वन जमिनी परत मिळवण्याची प्रक्रिया ही‎किचकट आहे. सर्वप्रथम वन हक्क दावे तपासावे‎लागतात. त्यानंतरच न्यायालयीन प्रक्रिया सुरू होते.‎न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत कारवाई करता येत नाही.‎- मनोजकुमार खैरनार, उपवन संरक्षक, मेळघाट व्याघ्र‎प्रकल्प

Advertisement

‎प्रकरण एफआरएमध्ये‎आहे का, पाहावे लागते

अतिक्रमणाची प्रकरणे आहेत. परंतु,‎ती वन हक्क दाव्यांनुसार (फाॅरेस्ट‎राईट्स अॅक्ट) तर नाहीत ना, याची‎आधी खातरजमा करावी लागते.‎त्यामुळे अतिक्रमित वन जमिनी परत‎मिळवण्यास वेळ लागतो.‎अमित मिश्रा, उपवन संरक्षक,‎अमरावती विभाग.‎अमरावती

Advertisement

वन‎विभागात ३४६ प्रकरणे‎

अमरावती वन विभागात संस्थांसह‎शेतीसाठी अतिक्रमण केलेल्या वन‎जमिनींच्या प्रकरणांची संख्या ३४६ असून,‎एकूण २६.७३५ हजार हेक्टर जमीन ही‎अतिक्रमित आहे. यात संस्था, संघटनांनी‎ताब्यात घेतलेल्या वन जमिनीची ३९‎प्रकरणे आहेत. उर्वरित प्रकरणे ही‎मेळघाटातील आहेत.‎

Advertisement



Source link

Advertisement