जलसाठा: पश्चिम विदर्भातील मोठ्या‎ प्रकल्पात ३९ टक्के जलसाठा‎, सर्वाधिक साठा ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात


अकोला2 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

पश्चिम विदर्भातील ९ मोठ्या‎ प्रकल्पात साठवण क्षमतेच्या ३९.७२‎ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.‎ सर्वाधिक जलसाठा अमरावती ‎जिल्ह्यातील ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात, तर ‎सर्वात कमी जलसाठा बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पात‎ आहे.‎

Advertisement

अमरावती जिल्ह्यात ऊर्ध्व वर्धा,‎ यवतमाळ जिल्ह्यात पूस, अरुणावती,‎ बेंबळा, अकोला जिल्ह्यात काटेपूर्णा,‎ वान. बुलडाणा जिल्ह्यात नळगंगा,‎ पेनटाकळी आणि खडकपूर्णा असे‎ एकूण नऊ मोठे प्रकल्प आहेत. या‎ प्रकल्पामुळे १३९९.९१ दलघमी साठवण‎ क्षमता निर्माण झाली आहे. तर वाशीम‎ जिल्ह्यात एकही मोठा प्रकल्प नाही.‎

कोणत्या जिल्ह्यात किती जलसाठा?

Advertisement

मागील वर्षी जोरदार पाऊस झाल्याने‎ सर्वच मोठ्या प्रकल्पाचे अनेकदा‎ दरवाजे उघडावे लागले होते. त्यामुळे‎ मे अखेरीसही मोठ्या प्रकल्पात‎ बऱ्यापैकी जलसाठा उपलब्ध आहे.‎ तसेच अमरावती जिल्ह्यात सात‎ मध्यम, यवतमाळ जिल्ह्यात सहा,‎ अकोला जिल्ह्यात चार, वाशीम‎ जिल्ह्यात तीन, तर बुलडाणा जिल्ह्यात‎ सात मध्यम प्रकल्प आहेत. या‎ प्रकल्पांमुळे ७६५.०३ दलघमी साठवण‎ क्षमता निर्माण झाली आहे. तूर्तास‎ मध्यम प्रकल्पात ३४०.२० दलघमी‎ जलसाठा उपलब्ध आहे.‎

मोठ्या प्रकल्पातील‎ जलसाठा दलघमीत‎ ऊर्ध्व वर्धा- २५९.६१, पूस प्रकल्प-‎ ४४.७१ , अरुणावती- ५७.८० ,‎ बेंबळा प्रकल्प- ७२.१९ , काटेपूर्णा-‎ २७.३४, वान- ३४.०३ , नळगंगा-‎ २०.४४ , पेनटाकळी- २८.३९ ,‎ खडकपूर्णा- १०.९४‎

Advertisement



Source link

Advertisement