पंजाब किंग्सच्या संघाने फक्त एकाच रात्रीत आपला कर्णधार बदलल्याचे आता समोर आले आहे. हैदराबादविरुद्धच्या सामन्यासाठी जेव्हा शिखर धवन नाणेफेकीसाठी आला तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला. नाणेफेक झाल्यानंतर आपल्याकडे का नेतृत्व सोपवण्यात आलं आहे, याचा खुलासा धवनने केला आहे. पंजाबच्या संघाला एकाच रात्रीत कर्णधार बदलण्याची पाळी का आली, जाणून घ्या सर्व माहिती, कारण पंजाबचा कर्णधार हा मयांक अगरवाल आहे, पण धवन कसा काय नाणेफेकीला आला, हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. पण त्यानंतर पंजाबच्या संघाला एका रात्रीतच आपला कर्णधार बदलावा लागला आणि धवनकडे संघाचे नेतृत्व सोपवावे लागले.
एकाच रात्रीत पंजाबला का बदलावा लागला कर्णधार, जाणून घ्या…
शिखर धवन आता पंजाबचा १४वा कर्णधार ठरला आहे. गेल्या १५ वर्षांमध्ये पंजाबने बरेच कर्णधार बदलले आहेत. २००८ साली पंजाबचा कर्णधार हा युवराज सिंग होता, त्यानंतर कुमार संगकारा, महेला जयवर्धने ते लोकेश राहुलपर्यंत बरेच कर्णधार पंजाबने पाहिले आहेत. या हंगामासाठी मयांक अगरवालला कर्णधार बनवण्यात आले होते, पण आता रविवारच्या सामन्यात धवनला नेतृत्व करताना पाहताना सर्वांनाच धक्का बसला. याबाबतचा मोठा खुलासा धवनने केला आहे.
धवन जेव्हा नाणेफेकीसाठी आला तेव्हा त्याला मयांक अगरवाल का दिसत नाही, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर धवन म्हणाला की, ” या सामन्याच्या पूर्वसंध्येला मयांकला गंभीर दुखापत झाली आहे, त्यामुळे तो आजच्या सामन्यात खेळू शकणार नाही. सामना सुरु होण्याच्या काही तासांपूर्वीच मला ही कल्पना देण्यात आली. त्यामुळे प्रभारी कर्णधार म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली आहे. मयांकच्या जागी संघात प्रभसिमरन सिंगची निवड करण्यात आली आहे. मला अशी आशा आहे की, मयांक लवकरच ठीक होईल आणि तो पुढच्या सामन्यात पुन्हा एकदा संघाची कमान सांभाळेल.”
मयांकला सामना सुरु होण्याच्या पूर्वसंध्येला दुखापत झाली, त्यामुळे एका रात्रीत कर्णधार बदलण्याची पाळी यावेळी पंजाबच्या संघावर आली. पंजाबच्या संघात धवनसारखी अनुभवी व्यक्ती असल्यामुळे त्यांच्याकडे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय पंजाब किंग्सच्या संघाने यावेळी घेतला असावा. त्यामुळे आता मयांक पूर्णपणे कधी बरा होतो आणि पुन्हा एकदा त्याच्याकडे संघाचे नेतृत्व सोपवले जाते का, याकडे सर्वांचे लक्ष असेल.