आयपीएलचा पंधरावा हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे. गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन संघांनी याआधीच प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. तर उरलेल्या संघांमध्ये प्लेऑफर्यंत पोहोचण्यासाठी चढाओढ रंगली आहे. असे असताना आता बीसीसीआयने अंतिम सामन्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या सामन्याची वेळ बदलण्यात आली आहे.
येत्या २९ मे रोजी आयपीएल क्रिकेटचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. याआधी या सामन्याची सुरुवात सायंकाळी ७.३० वाजता होणार होता. तर अर्ध्या तासाआधी म्हणजेच ७ वाजता नाणेफेक होणार होती. मात्र आता बीसीसीआयने या सामन्याची वेळ बदलण्याचा निर्णय घेतला असून सामना ७.३० ऐवजी अर्धा तसा उशिराने म्हणजेच ८ वाजता सुरु होण्याची शक्यता आहे. तर नाणेफेक ७.३० वाजता केली जाऊ शकते.
समारोप समारंभ होणार आहे
वृत्तानुसार, अंतिम सामन्यापूर्वी आयपीएलचा समारोप सोहळा होणार आहे. यामध्ये बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. समारोप समारंभ २९ मे रोजी सायंकाळी ६:०० वाजता सुरू होईल आणि ५० मिनिटे चालेल. यानंतर, नाणेफेक साडेसात वाजता होईल आणि अंतिम सामना ७:३० वाजता सुरू होईल. या वर्षी २६ मार्च रोजी उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला नव्हता. मात्र समारोप समारंभ आयोजित करण्याचा निर्णय सर्वोच्च परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला.
क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयकडून आयपीएलमध्ये पुन्हा एकदा ओपनिंग आणि क्लोजिंग शेरेमनी (उद्घाटन आणि समापन समारोह) आयोजित करण्याचा विचार केला जात आहे. या हंगामात उद्घाटन समारंभाचे आयोजन करता आले नाही. मात्र यावेळी समापन समारोह आयोजित केला जाणार आहे. हा समारोहाची सुरुवात ६.३० वाजता सुरु होणार असून तो ५० मिनिटांचा असेल. समापन समारोह संपल्यानंतर नाणेफेक आणि अंतिम सामन्याला सुरुवात होईल. याच कारणामुळे आयपीएलचा अंतिम सामना अर्धा तास उशिराने सुरु होणार आहे.
दरम्यान, आयपीएलचा अंतिम सामना अहमदाबादमधील मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सध्या प्लेऑफमध्ये लखनऊ आणि गुजरात या संघांनी आपले स्थान पक्के केले आहे. आणखी दोन संघाची प्लेऑफमध्ये निवड झाल्यानंतर एकूण चार संघांमध्ये प्लेऑफचे सामने खेळवले जातील. त्यानंतर टॉप दोन संघांमध्ये अंतिम सामना खेळवला जाईल.