मुंबई26 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
नियम आणि तरतुदींच्या आधारावर निर्णय होईल, अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुंबईत दाखल झाल्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आता राहुल नार्वेकर घेणार आहेत. त्यामुळे त्यांच्या वाटेकडे ठाकरे गटासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.
राज्यभरात प्रचंड उत्सुकता असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत परखड शब्दांमध्ये राज्यपालांच्या भूमिकेवर ताशेरे आढले आहेत. तसेच अपात्र ठरवलेल्या 16 आमदारांबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवले आहे. आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या आमदारांचा निर्णय घेतील.
मी उशिरा आलेलो नाही
राहुल नार्वेकर हे लंडन दौऱ्यावर होते. आजच ते लंडनवरुन मुंबईत दाखल झाले आहेत. यावेळी राहुल नार्वेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. नार्वेकर म्हणाले, मी उशिरा आलेलो नाही किंवा वेळेआधी देखीलही प्रक्रिया मोठी आहे. सगळ्या तरतुदींच्या आधारे निर्णय होईल.
कायद्याच्या चौकटीतच निर्णय
राहुल नार्वेकर म्हणाले, मागण्या सगळ्यांच्या येत आहेत. मात्र कायद्याच्या आधारेच निर्णय घेण्यात येईल. विलंब करायचा नाही. जो निर्णय होईल तो कायद्याच्या चौकटीतच होईल. विधानसभा उपाध्यक्षांचे अधिकार त्यांना माहित आहे. अध्यक्षांची नियुक्ती नसताना उपाध्यक्षांकडे त्यांचे अधिकार असतात. मात्र अध्यक्ष असताना त्यांच्याकडे कोणतेही अधिकार नसतात.
मी घटनेनुसारच निर्णय घेईल
राहुल नार्वेकर म्हणाले, कायद्यात जे प्रावधान आहे त्यानुसार निर्णय घेण्यात येईल. प्रक्रिया 15 दिवसात पूर्ण झाली तर 15 दिवसात निर्णय घेऊ. कोणाच्या इच्छेनुसार निर्णय होणार नाही. अध्यक्षांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला तर आपल्याकडे अनेक मार्ग आहेत. मी जो निर्णय घेईल तो घटनेनुसारच असेल.
प्रक्रिया थांबलेली नाही
राहुल नार्वेकर म्हणाले, मला माझे अधिकार माहित आहे. आणि ते कसे बजावायचे तेही माहित आहेत. मी दबावाकडे लक्ष देत नाही. कायद्याच्या अनुषंगाने निर्णय होईल. प्रक्रियेला जितके दिवस लागतील तितके दिवस लागतीलच. प्रक्रिया थांबलेली नाही. सुप्रीम कोर्टाने सूचना केल्या आहेत.
नियमानुसारच निर्णय
राहुल नार्वेकर म्हणाले, मला खात्री आहे. मी ज्या सभागृहाचे नेतृत्व करतो. घटनेत दिलेल्या तरतुदींप्रमाणे असेल. नियमानुसार निर्णय घेण्यात येईल. सर्व बाबींचा विचार करावा लागेल. राजकीय पक्षाचे नेतृत्व कोण करत होते. याचिकेत काय म्हटले आहे, आदी बाबी तपासल्या जातील. निर्णय काय घेणार हे आत्ताच सांगितले तर जनतेवर अन्याय. तडकाफडकी निर्णय घेतला तर म्हणतील की अध्यक्षांनी दबावात निर्णय घेतला.
लवकरच निर्णय
राहुल नार्वेकर म्हणाले, दाखल याचिकेत काय मुद्दे आहेत हे सर्व पाहावे लागेल. विषय समजून घ्यायची गरज आहे. भरत गोगावलेंची नियुक्ती अयोग्य असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल. भरत गोगावले की एकनाथ शिंदे यांची निवड कायमस्वरुपी अवैध ठरवलेली नाही.